![श्री विशाल गणेश मंदिर व ज्ञानदा प्रतिष्ठान यांच्यावतीने रक्तदान शिबीर संपन्न](https://ahilyanagarupdate.com/wp-content/uploads/2024/01/Polish_20240128_202119312-2-600x400.jpg)
श्री विशाल गणेश मंदिर व ज्ञानदा प्रतिष्ठान यांच्यावतीने रक्तदान शिबीर संपन्न
रक्तदानाच्या उपक्रमातून गरजू रुग्णांना लाभ – संगमनाथ महाराज युवक ही समाजाची शक्ती आहे, या शक्तीचा धार्मिक, सामाजिक कार्यात सद्उपयोग झाला पाहिजे. यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन आणि सामाजिक उपक्रमात सक्रिय केले पाहिजे. ज्ञानदा प्रतिष्ठान हे नेहमीच सामाजिक कार्यातून समाजाला दिशा देण्याचे काम करत आहे. आज रक्तदानासारखा उपक्रम राबविल्याने गरजू रुग्णांना त्यांचा लाभ होणार आहे. अशा उपक्रमांची समाजाला गरज आहे. या उपक्रमात युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आरोग्य सेवेत आपले योगदान द्यावे, असे आवाहन श्री विशाल गणेश देवस्थानचे महंत संगमनाथ महाराज यांनी केले. श्री विशाल गणेश मंदिर व ज्ञानदा प्रतिष्ठान यांच्यावतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन महंत संगमनाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन हिरवे, अभय टाक, गणेश राऊत, प्रतिक गिरमे, सचिन आनारसे, केदार फुलसौंदर, गणेश पितळे, निसार शेख, अमोल जाधव आदि उपस्थित होते. याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन हिरवे म्हणाले, आपण समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून काम केले पाहिजे. आज प्रत्येकजण बिझी आहे. परंतु चांगली-वाईट वेळ प्रत्येकावर येत असते. अशा परिस्थितीत त्याला मदतीचा हात दिला पाहिजे. रक्ताची गरज ही अत्यावश्यक बाब झाली आहे. रक्तदानाशिवाय त्याला पर्याय नाही. त्यामुळे युवकांनी रक्तदान चळवळी सहभागी झाले पाहिजे. ज्ञानदा प्रतिष्ठानने नेहमीच सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देत वृक्षारोपण, गरजूंना मदत, शैक्षणिक साहित्याचे वाटप, अन्नदान त्याचबरोबर दरवर्षी रक्तदानासारखा महत्वाचा उपक्रम राबवित असते. आजच्या रक्तदान शिबीरास युवकांनी दिलेला प्रतिसाद आमचा उत्साह वाढविणार असल्याचे सांगितले. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अॅड.अभय आगरकर, सचिव अशोकराव कानडे, विश्वस्त विजय कोथिंबीरे, प्रा.माणिकराव विधाते, पांडूरंग नन्नवरे, ज्ञानदा प्रतिष्ठानचे ज्ञानेश्वर बर्वे, शिवाजी पठारे, विश्वसराव चेडे, महेश सोनूले, संदिप दळवी, नामदेव दहिंडे, मधुकर गाडे, स्वप्नील गवळी, शेखर पुंड, जयदीप पादीर, वैभव भोंग, किरण रडे, सविता खंदारे आदि उपस्थित होते. रक्त संकलनाचे कार्य अर्पण ब्लड बँकेचे भाग्यश्री पवार, सुषमा वैद्य, अशोक मुंडे यांच्यावतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश राऊत यांनी केले तर आभार अभय टाक यांनी मानले.