अहमदनगर
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेला लढा आता अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथून मुंबईतील आझाद मैदानापर्यंत मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोहोचणार असून. पाथर्डी येथुन अहमदनगर शहरांमध्ये रात्री बारा वाजता त्यांचं आगमन झालं. त्यावेळी जेसीबीच्या सहाय्याने त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी मराठा समाज बांधवांना संबोधित केल.
बारा बाबळी या ठिकाणी मदरशाच्या दीडशे एकरच्या मोकळ्या भूखंडावर आलेल्या सर्व मराठा समाज बांधवांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती सभा संपल्यानंतर मुस्लिम समाजाच्या वतीने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
रात्री एवढ्या कडाक्याच्या थंडी देखील अहमदनगर शहर व जिल्ह्यातून आलेले सर्व मराठा बांधव संघर्ष होता म्हणून जरांगे पाटील यांना ऐकण्यासाठी रात्री दोन वाजेपर्यंत या हजारोच्या संख्येने कार्यक्रम स्थळी उपस्थित होते..