अहमदनगर
राहुरी तालुक्यातील आढाव दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ गेल्या तीन तारखेपासून अहमदनगर शहरातील जिल्हा सत्र न्यायालयातील वकील बांधवांनी आपले काम बंद आंदोलन सुरू केले होते तसेच वकील प्रोटेक्शन कायदा कायदा लागू व्हावा यासाठी जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेर धरणे आंदोलन देखील सुरू होते.
आढाव दांपत्याच्या हत्येचा निषेध व ऍडव्होकेट प्रोटेक्शन कायदा लागू व्हावा यासाठी आज अहमदनगर जिल्ह्यातील सर्व वकील बांधवांनी पायी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आला असता जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट पोलीस प्रशासनाकडून लावून घेण्यात आले.यावेळी वकील बांधवांनी घोषणा देत तसेच पाण्याच्या बॉटल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात फेकत गेटवर चढून निदर्शने केली यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचे परिसर दणाणून गेला होता.
जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट न उघडल्याने अहमदनगर शहरातील वकील आक्रमक
![](https://ahilyanagarupdate.com/wp-content/uploads/2024/02/Polish_20240209_162133765.jpg)