मनसे नेते नितीन भुतारे यांची मागणी
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघ हा अनेक दिवसांपासून विकासापासून वंचित आहे त्यातच सध्याचे खासदार डॉक्टर सुजय विखे यांचे काम सुध्दा असमाधानकारक आहे सध्या त्यांचे मतदार संघात साखर, डाळ वाटपाचे काम सुरू आहे त्याचे कार्यक्रम प्रत्येक गावात ते घेत आहे परंतू अनेक ठिकाणीं त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे नागरिकांच्या म्हणण्यानुसार सुजय विखे यांचे काम साखर, डाळ वाटपाचे नसुन जनतेला पाणी देण्याचे आहे ते काम सध्या ते करत नाही आहेत हे दिसुन येते जर अमीत साहेब ठाकरे यांनी हि लोकसभा निवडणुक लढविली तर ते नक्कीच निवडून येतील तसेच राज साहेबांची विकासाची दुरदृष्टी लक्षात घेता संपुर्ण दक्षिण लोकसभा मतदार संघातील मतदार भरघोस मते हे मनसेच्या पारड्यात टाकतील त्यामुळे जिल्ह्यात मोठी ताकद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाढेल अहमदनगर जिल्हा हा सहकार साखर सम्राटांचा जिल्हा आहे अनेक दिग्गज नेते येथे होऊन गेले, आहेत परंतु म्हणावा तसा विकास झालेला दिसत नाही त्यामुळे अमीत साहेब ठाकरे यांनी हि येणारी लोकसभा निवडणूक दक्षिण नगर या मतदार संघातून लढवावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईमेल द्वारे पत्र पाठवून मनसे जिल्हा सचिव जिल्ह्याचे नेते नितीन भुतारे यांनी मागणी केली आहे त्यामुळे राज ठाकरे तसेच अमीत ठाकरे काय निर्णय घेतात या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर अमीत ठाकरे यांच्या सारखा तरूण नेता दक्षिण लोकसभेत उतरला तर तरूण मतदार मोठया प्रमाणावर आकर्षित होईल त्यामुळे भाजप पक्ष समोर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढें मोठे आव्हान निर्माण होईल तसेच सुजय विखे यांची डोके दुखी वाढेल या मागणीची जोरदार चर्चा नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात सूरू आहे