शहरातील वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा तीव्र आंदोलन – संपत बारस्कर
नगर : शहरात गेले कित्येक दिवसापासून शहर व उपनगरामध्ये नागरीकांना तथा आपल्या ग्राहकांना पुर्व कल्पना न देता वारंवार बीज खंडीत केली जात आहे. गेल्या 15 दिवसामध्ये वीज खंडीत होण्याचे प्रमाण चाढल्याचे दिसून येत आहे. थोड्या प्रमाणात बादळी वारे सुटले की लगेच वीज खंडीत होते. तसेच उन्हाळ्याचे दिवस सुरु असून उष्णेतेची तीव्रता वाढली असून लाईट गुल होण्याचे प्रमाण वाढले असून नागरिक हैराण झाले आहे. त्याचप्रमाणे पुढील महिन्यात पावसाळा सुरू होत असून मान्सूत पूर्व तयारी कुठेही दिसून येत नाही. तसेच विद्युत तारांवरील झाडांच्या फांद्या तोडून उचलून घेऊन जाव्यात आणि शहरातील विदूत कार्यालयात नागरिकांचे आलेले फोने उचलावेत तसेच फोन न उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी.
विधुत विभागाच्या वतीने नागरिकांना वेठीस धरण्याचे काम केले जात आहे त्याचा निषेध म्हणून ष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अधिक्षक अभियंता कार्यालयात लाईट बंद करून गॅस बत्ती व मेणबत्ती पेटवून आंदोलन करण्यात आले. अन्यथा लवकरच शहरातील वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल अशा ईशारा राष्ट्रवादी कॉंग्रस पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष संपत बारस्कर यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अधिक्षक अभियंता कार्यालयात लाईट बंद करून गॅस बत्ती व मेणबत्ती पेटवून आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अधिक्षक अभियंता कार्यालयात लाईट बंद करून गॅस बत्ती व मेणबत्ती पेटवून आंदोलन.
शहरात लाईट गुल नागरिक हैराण
![](https://ahilyanagarupdate.com/wp-content/uploads/2024/05/CopyofRedBoldFinanceYouTubeThumbnail.png)